MPSC : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत गट ब व गट क संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
ही भरती एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
👇👇👇
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
पदसंख्या MPSC
- एकूण – 8169 रिक्त जागा
पदांचा तपशील
- सहायक कक्ष अधिकारी – 78 जागा
- राज्यकर निरीक्षक – 159 जागा
- पोलीस उपनिरीक्षक – 374 जागा
- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक – 49 जागा
- दुय्यम निरीक्षक, गट-क, राज्य उत्पादन शुल्क (गृह) – 6 जागा
- तांत्रिक सहायक, गट-क (वित्त) – 1 जागा
- कर सहाय्यक, गट-क (वित्त) – 468 जागा
- लिपिक-टंकलेखक – 7034 जागा
👇👇👇
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
- उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता आवश्यक.
- विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.
- पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील,परंतु मुख्य परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांक पर्यंत पदविका/पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
अर्ज शुल्क
- अमागास – 394/-
- मागासवर्गीय- 294/-
अर्ज पद्धती MPSC
- ऑनलाईन
👇👇👇
अधिकृत वेबसाईट संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Online अर्ज सुरु होण्याची तारीख
- २५ जानेवारी २०२३
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
- १४ फेब्रुवारी २०२३
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- उमेदवार हा भारतीय नागरिक असावा, उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी अर्ज जाहिरातीत दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत इतर पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
- उमेदवाराने अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येतील.
- अर्ज सादर करतानाच जिल्हा केंद्राची निवड करणे आवश्यक आहे.
- जिल्हा केंद्र बदलाबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत अथवा कोणत्याही कारणास्तव मान्य करण्यात येणार नाही.
- एकदा भरलेले अर्ज शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही
- आयोगाच्या कार्यालयात, परीक्षा कक्षात, परीक्षा केंद्राच्या परिसरात तसेच शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या वेळी मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे.